कधी काळी व्यक्त होण्यासाठी तुला लिहून काढायची आता मात्र तुझ्याकडे बघुन शब्द बंद झाली सुचायची व्यक्त होताना तेव्हा शब्दात गुंतून जायची मी आता मात्र तुझ्या डोळ्यात कैद होऊन जाते मी
मैत्रीचे प्रेम हे कधी पलीकडे गेले याचे भान हि मला राहिले नव्हते मात्र मला हे कधीच पटवून देता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही अश्रू तुझ्या डोळ्यात असायचे मात्र मन माझे हळवे व्हायचे झालेला हळवेपणा मला कधी दाखवताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही कित्येक आठवणी साठवून ठेवल्या , प्रत्येक आठवणी लिहून ठेवल्या मात्र त्या कधी तुझ्या समोर मांडता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही बघताच तुला मन फुलून यायचं , सगळी कडे आपला सुवास पसरून बेभान करायचं त्या फुलांचा सुगंध तुला देताच आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही नकळत तुझ्याशी तासंतास बोलायची , दाटलेल्या भावनांशी झुंज माझी चालायची ओठांवरचे शब्द तुझ्या कानापर्यंत पोहचवता आले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही होताच तुझा स्पर्श मला , थोडी लाजून जायची मी शहारलेल्या हात मग अलगद तुझ्या कडे सरकवयाची बिनधास्त तुझ्या मिठीत यायला मला कधी जमले नाही कारण म्हणावे तसे आपले कुठलेच नाते नाही
निल त्याच्या घरी पोहचतो.तिच्याच विचारात तो मग्न झालेला असतो तेच क्षणर्थात त्याला चक्कर येऊन तो खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो . निलच्या घरचे गोंधळलेल्या अवस्थेत डॉक्टरला बोलावून त्याची तपासणी करतात , आणि घरच्यांसमोर गंभीर असे सत्य बाहेर येते . हल्ली रोज निल स्वतः या दुःखांमध्ये सतत अस्वस्थ असायचा , कारण घरच्या लोकांकडे त्याला द्यायला असा वेळच नसायचा .म्हणून कोणालाही न सांगता तो हे दुःख सहन करत होता , हे घरच्यांना कळताच सगळे घर हादरून जात . पण निल खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळतो . तेवढ्यात डॉक्टर बोलतात निलकडे खुप कमी वेळ आहे साधारणतः १ ते २ महिने . तेवढ्यात निल खचून जातो , त्याच्या डोळ्यांसमोर लगेच सई चा चेहरा येतो . त्याचे वचने , त्याचे प्रेम , घालवलेले ते क्षण त्याच्या पुढे येऊन पावसाच्या सरी सारखे बरसु लागतात . दुसरीकडे सईला मात्र याची काहीच कल्पना नसते. ती आपली स्वप्न सजवण्यात एवढी मग्न होते की आपले घर कसे असणार , आपण कुठे राहणार हे सुद्धा तिने ठरवून घेतले होते . शिवाय तिच्या नि निलबद्दलच्या नात
Chhan lihil
ReplyDelete